सिरसंगी प्रतिनिधी
कोळींद्रे – पोश्रातवाडी रस्त्यावरील पुलावर ये जा करताना चारचाकी व दुचाकीस्वाराना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो कारण एक गाडी समोरून आली तर दुसरी गाडी पास होत नाही यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे पूलाची रुंदीकरण करणे गरजेचे आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलावर संरक्षक कंठडे व गार्ड बसवावे अशी मागणी जनसेवा समाजसेवक नरसू शिंदे सामाजिक संस्था यांनी यापूर्वी निवेदनाद्वारे केली होती पण ब्रॅकेट बसून मिळण्याबाबत याबद्दल शासनाने कोणताही निर्णय वा दखलही घेतली नाही यामुळे कित्येक शाळकरी मुलांचा ज्येष्ठ नागरिकांचा बॅरिकेट नसल्यामुळे अपघात घडल्याचे निवेदनाद्वारे सांगण्यात आले. यावेळी निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य भिकाजीराव गोंधळी, शिंदे समाजसेवक आनंदराव सुतार ,अमर मटकर, शिवाजीराव घोरपडे, शिवाजी भगुत्रे इत्यादी कार्यकर्ते होते.














