सिरसंगी प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील मोरेवाडी पैकी धनगरवाडा येथे बिबट्याने तीन शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अजूनही दोन शेळ्या गायब असल्याचे शेतकऱ्यांनी माहिती दिली , या घटनेमुळे धनगरवाड्यासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पांडुरंग आडूरकर यांच्या दोन शेळ्या, तर कोंडीबा कोकरे यांची एक शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. तर कोडीब कोंकरे यांच्या अजून दोन शेळ्या गायब असल्याचे ककरे यांनी सांगितले . घटनेची माहिती कोंडीबा कोकरे यांनी वनविभागाला दिली. दरम्यान, धनगरवाडा परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, तसेच पशुपालकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे .














