सिरसंगी प्रतिनिधी
तब्बल २० वर्षानंतर झालेल्या कोळींद्रे पोश्रातवाडीची महालक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात व शांत़तेने पार पडली. या यात्रेसाठी लाखो भाविकांनी उपस्थितीती लावली होती. मंगळवारी रात्री गुलालच्या उधळणीत लक्ष्मी रथातून खेळवण्यात आली, रथ ओढण्यासाठी 25-30 वयोगटातील युवकांनी भाग घेतला, पहाटे 5 वाजता लक्ष्मी गदगेला बसली गुरुवारी मागणीचे दंडवत घातले गेले तर शुक्रवारी 8 मे रोजी ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. यात्राकाळात मुंबईकरांनी काही स्पर्धा घेतल्या, तर पोश्रातवाडी येथे यात्रेनिमित्त बैलगाडी स्पर्धा भरवण्यात आलेल्या होत्या, महालक्ष्मी यात्रा तारीख ठरल्या पासून ते लक्ष्मी पावे पर्यंत यात्रा कमिटीचे नेटके नियोजन राहिले, यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी विज वितरण मंडळाचे त्याचबरोबर आजरा पोलिस ठाण्याचे, आरोग्य विभागाचे कर्मचारी सहकार्य लाभल्याचे यात्रा कमिटी अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले, त्याचबरोबर मुंबई ग्रामस्थ मंडळ, आजी माजी पोलीस संघटना यांचेही योगदान लाभलेचे पाटील यांनी सांगितले.
















