- ग्रामस्थांची निवेदनातून मागणी ,
- रोहयोअंतर्गत 99 लाखांची कामे रखडल्याचा आरोप
- पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे व वीज खांबावर दिवे बसविण्याचीही केली मागणी
सिरसंगी प्रतिनिधी
हंदेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल रुक्मिणी वसाहतीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजना मधून मंजूर झालेल्या रस्त्यांची सुमारे 99 लाखांची कामे प्रशासन च्या निष्काळजीपणाने रखडली असून,संबंधितांवर कारवाई करून सदर कामे पावसाळ्यापूर्वी मार्गस्थ लावून ग्रामस्थांची चिखलातून चालण्याची सुटका करावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांचेकडे करण्यात आली आहे.निवेदनात असे नमूद केले आहे की सदर वसाहतीमध्ये पावसात मोठ्या प्रमाणात चिखल होतो.लोकांना चालणे ही अशक्य होते.अशी अवस्था ग्रामपंचायतीला माहीत असूनही सदर वसाहतीतील रस्ते करण्याची टाळाटाळ केली.सदर रस्ते डिसेंबर 2025 मध्ये मंजूर होऊनही या वसाहती मध्ये रस्त्यांची नितांत आवश्यकता असूनही संबंधितांनी टाळाटाळ केली असून सदर निधीची मुदत 31 मे ला संपणार असल्याचे समजते.तरी जर निधी परत गेला तर संबंधित प्रशासन व पंचायत समितीचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील.असे निवेदनात नमूद करण्यात आले असून.निवेदनात पुढे म्हटले आहे की सदर वसाहती मध्ये पिण्याच्या पाण्याची व वीज खांबावर वीज बल्ब बसविण्याची व्यवस्था करावी.तसेच गावातील रस्त्याचे उद्घाटन दीड वर्षापूर्वी होऊनही अद्याप रस्त्याचे काम सुरू नाही त्याचीही चौकशी व्हावी.असे म्हटले असून.जर कामाची पूर्तता नाही झाली तरी उग्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर विष्णू बावडेकर,शीतल कदम, छाया चव्हाण,मारुती राजाराम, आनंदा शिंदे,संभाजी जाधव यांच्यासह 20 ग्रामस्थांच्या सह्या आहेत.निवेदनाच्या प्रति तहसीलदार आजरा,बांधकाम सभापती जी. प ., व सी. इ. ओ. जी. प. कोल्हापूर यांना देण्यात आल्या आहेत.यावेळी पंचायत समिती सदस्य समीर पारदे,विस्तार अधिकारी बी. टी.कुंभार व इतर उपस्थित होते.यावेळी बी डी ओ सुभाष सावंत यांनी ग्रामसेवकांना सदर काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या . सरपंच वंदना सावंत यांनी संबंधित ठेकेदार यांना दोन दिवसात काम सुरू करा असे ग्रामस्थांसमोर सांगितले आहे.















