महादेव कुडव सिरसंगी
सिरसंगी यमेकोंड परिसरात धुमाकूळ घालत असलेल्या हत्तीने सोमवारी रात्रभर यमेकोंड गावा लगत असलेली ऊस पिकाचे, काजू व आंबा झाडांचे नुकसान करून सकाळी 7 वाजता प्राथमिक शाळेच्या आवारातून फेरफटका मारत सुनील दळवी यांच्या फार्म हाऊस जवळून पुनः सिरसंगी जंगलात निघून गेला . सध्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी हत्ती सायंकाळी 5 वाजताच शिवारात उतरत आहे. चार दिवसापासून हत्तीने काजू आंबा झाडे मुळासकट उपटणे फांद्याची मोडतोड त्याचबरोबर गवताच्या रचलेल्या गंजी विसकटणे यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेती करायची की सोडून द्यायची असा यक्ष प्रश्न शेतकाऱ्यांसामोर उभा राहीला असून गवा रेड्याच्या कळप आलेले ऊस खोडवा पीक फस्त करत आहेत. हत्ती मुळे रात्री शिवाराची राखण करणे मुस्किल झाले आहे .
वनविभाग सावधानतेने कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे पंचनामे करून तुरळक नुकसान भरपाई ध्यायची तर दुसरीकडे हत्तीला हुसकाऊन लावण्याचा निव्वळ दिखावा करायचा यामुळे शेतकऱ्याना वाली कोणीच नाही, हे दिसून येते.

यमेकोंड परिसरात फेरफटका मारताना हत्ती













