सिरसंगी प्रतिनिधी
श्रमिक सेवा तरुण मंडळ व वनविभागातर्फे खास वटपोर्णिमानिमित्त किणे येथे वृक्षारोपण करण्यात आले . यावेळी वन विभागाचे वनक्षेत्रपाल दत्तात्रय पाटील यांनी विद्या मंदिर किणे शाळेच्या विद्यार्थ्यांना वनस्पती जल जंगल माणूस या विषयावर मार्गदर्शन केले . श्रमिक सेवा तरुण मंडळाचे अध्यक्ष महादेव सुतार यांनी विद्यार्थ्यांना झाडे वाचवणे ही काळाची गरज असल्याचे सांगून मार्गदशन केले . कार्यक्रमासाठी शाळेचा सर्व शिक्षकवर्ग , विद्यार्थी तसेच आजरा चंदगड गडहिंग्लज सामाजिक वनिकरणचे वनक्षेत्रपाल दता पाटील सर चंदगड चे वनपाल सलीम मुल्ला सर आणि श्रमिक मंडळाचे कार्यकर्ते परशराम यादव , दीपक केसरकर , विष्णु तुकाराम केसरकर , अशोक कांबळे , शाळा व्यवस्थापनचे संदीप केसरकर ,आजरा वनपाल शारदा पाटील , वनरक्षक पूजा मोरे, ग्रामसेवक कविता कोकितकर उपस्थित होते














