पाण्याअभावी पिके वाळली , शेतकरी हवालदिल
सिरसंगी प्रतिनिधी
जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने नदी ,नाले, तारओहळ, ओढे कोरडेच आहेत , विहीरीनिसुद्धा तळ गाठला असल्यामुळे पिकाला पाणी द्यायचे किती असा प्रश्न शेतकऱ्यासामोर पडला आहे , यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून आठ दिवसांपूर्वी दोन दिवस तुरळक स्वरूपात पडलेल्या पावसामुळे तग धरून असलेली भातपिके आता उन्हाच्या लाहित कोमेजून गेली असल्याचे चित्र शेत शिवारात पाहायला मिळत आहे . हवामान खात्याने जुलै महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असल्यामुळे शेतकरी आशेने पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.












