महादेव कुडव सिरसंगी
सध्या आजरा तालुक्यातील सिरसंगी येथील शेतशिवारात हत्तीने धुमाकूळ घातला असून हत्तीबरोबर गव्यांचा कळप आलेले खोडवा पीक फस्त करत आहे दररोज सुमारे ४ ते ५ एकर शिवारातील ऊसाचे खोडवा पीक गव्यांकडून फस्त होत आहे. यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसामोर पडला आहे . गेले दहा दिवस हत्तीकडून शेतात असलेले पाईपलाईन पाण्याची टी चे नुकसान, केळी काजू ची झाडे मूळापासून उपटून टाकत आहे . बुधवारी रात्री सुरेश सावंत यांची रचलेली गवत व पयान गंजी शिवारभर विस्कटली असून त्यांच्या पाईपलाईन ही नुकसान केले आहे दशरथ येलगार यांची गोट्याशेजारी उभी केलेली बैलगाडीचे नुकसान करून उभ्या ऊस पिकाचे नुकसान केले आहे . गेले चार दिवस हत्तीबरोबर ३० ते ३५ गव्यांचा कळप फिरत असून उसाचे खोडवा पीक फस्त करत आहेत. गेल्या चार दिवसात चाळू सावंत, लक्ष्मण सावंत, शेवंता सावंत, बाजीराव पाटील यांच्या खोडवा पिक फस्त केले आहे .
हत्तीच्या भीतीपोटी ऊस पिकाचे राखण करणे अवघड झाले आहे. दररोजचे होणारे पिकाचे नुकसान व वनविभागाकडून मिळणारी तुटपुंजी नुकसानभरपाई यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे . वनविभागाने आमची शेतीच भाडेतत्वावर घ्यावी व आमचे पालनपोषण करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत .

















