
सर्वसामान्य गरीब वंचित घटकातील लोकांचे आयुष्य उभे करणे व बदल घडून आणणे हेच माझे उद्दिष्ट आहे सत्ता पैसा ताकत दुर्बलांना व गरिबांना संपवण्यासाठी नाही तर त्यांचा उपयोग उभे करण्यासाठी झाला पाहिजेत हेच स्वप्न उराशी बाळगून वाटंगी पंचायत समितीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे.
माझ्याकडे कोणतेही पद नसताना मी स्वखर्चाने 2016 ते 2025 पर्यंत 1000 महिला व सर्वसाधारण लोकांना गावरान कुकुटपालन व्यवसाय घालून दिला . गावोगावी व्यसनाधीन होऊन फिरणाऱ्या तरुणांना आजरा कोळिंद्रे नेसरी येथे स्वखर्चाने दुकाने घालून दिली. दरवर्षी गरजू 5000 मुलांना शालेय साहित्य वाटप करतो. हे 1000 महिलांना कोळिंद्रे येथे रोजगार मार्गदर्शन मेळावा घेतले आहेत विधवा व देवदासी महिलांना प्रबोधनातून समाजातील मानसिकता यावर हजारो महिलांना समुपदेशन केले आहे. अपंग लोकांना मार्गदर्शन करून त्यांना स्वखर्चाने व्यवसाय उभा करून दिले .24 कुटुंबांना आणि जेष्ठ नागरिक व आधार नसलेल्या व्यक्तींना किराणामाल व जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांचा चरितार्थ चालवतो. मी सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार असून. मला समाजसेवेतून 16 राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये वसुंधरा राज्यस्तरीय पुरस्कार व सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय पुरस्कार यांचा समावेश आहे.














