गेल्या आठ दिवसांपासून हत्तीचा कहर सुरूच असून सिरसंगी येथील शेतशिवारातील केळी, ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला असून शेतामधील पाण्याची टि, पाईप लाईन याची नासधूस केली आहे.
तुकाराम मातवणकर यांच्या शेतातील केळी,पपई झाडांचे नुकसान केले आहे. तर संतराम पाटील , नितेश देसाई यांच्या शेततळ्यातून जोडलेल्या पाईप लाईनची नासधूस केली आहे.
वनविभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.














